अण्णाभाऊ साठेंचा जीवनपट
- १. जन्म: १ ऑगस्ट १९२०
- २. जन्मस्थळ : वाटेगाव, ता. वाळवा, जि. सांगली
- ३. आईचे नाव : वालुबाई
- ४. वडिलांचे नाव : भाऊ सिधोजी साठे
- ५. वडील भाऊ साठे १९२५ च्या सुमारास मुंबईला गेले. ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या बागेत काम करायला लागले.
- ६. अण्णाला शाळेत घातले पण दुसऱ्याच दिवशी शिक्षकांनी मारले आणि दीड दिवसानंतर शाळा कायमची सुटली.
- ७. याच काळात बापू साठे या चुलत भावाच्या तमाशात साथ देऊ लागले.
- ८. १९२९-३० च्या सुमारास वडिलांची मुंबईची नोकरी संपली. ते वाटेगावला परत आले.
- ९. १९३१ साली भाऊ साठे पत्नी, अण्णा, शंकर आणि लहान मुलगी यांना घेऊन मुंबईला आले.
- १०. मुंबईचा २२७ किलोमीटरचा प्रवास पायीच केला.
- ११. भायखळ्यातील चाँदबीबी चाळीत खोली घेतली.
- १२. प्रारंभी अण्णा एका कापड विक्रेत्यासोबत कापडाचे गाठोडे घेऊन मुंबईत कपडे विकत फिरले.
- १३. पुढे ते गिरणी कामगार झाले.
- १४. याच काळात हे जिद्दीने साक्षर व्हायला लागले.
- १५. १९३९ मध्ये वडिलांचा मृत्यू
- १६. याच काळात कोंडुबाई या काळगाव, ता.पाटण, जि. सातारा येथील अशिक्षित तरुणीशी लग्न
- १७. भायखळ्यानंतर ते चेंबूरच्या झोपडट्टीत राहू लागले.
- १८. याच काळात दादर (पूर्व) च्या मोरबाग मिलमध्ये ते कामगार म्हणून लागले.
- १९. कामगार मित्रांच्या मदतीने त्यांना माटुंगा लेबर कॅम्पमध्ये खोली मिळाली.
- २०. इथे ते १९४५ मध्ये स्थिरावले.
- २१.१९४२-४३ च्या सुमारास अनेक उत्सवांमधून पोवाडे म्हणून लागले.
- २२.१९४२ साली ‘नानकिंग नगरापुढे’ आणि ‘स्टॅलिनग्राडचा पोवाडा’ लिहिला.
- २३.१९४४ : अमरशेख, दत्ता गव्हाणकर आणि अण्णा भाऊ यांना एकत्र आणून साम्यवादी कार्यकर्त्यांनी ‘लाल बावटा कलापथक’ स्थापन केले.
- २४.साम्यवादी पार्टीचे कार्डहोल्डर झाले
- २५.साप्ताहिक लोकसाहित्य, युगांतर अशा पक्षपत्रांमधून वार्तापत्रे लिहू लागले, त्यांची ही पत्रकारिता.
- २६. १९४३-४४ साली अण्णांनी पहिल्या पत्नीला आणि आईला वाटेगावी पाठविले.
- २७. १९४५ पूर्वी माटुंगा लेबर कॅम्पमध्ये राहिले.
- २८. १९४५ साली जयंवताबाईशी नोंदणी पद्धतीने विवाह केला.
- २९.१९४५ ते १९६७ घाटकोपरच्या चिरागनगर झोपडपट्टीत वास्तव्य.
- ३०.१९४९ कथालेखनाला प्रारंभ
- ३१.१९४९ मध्ये ‘मशाल’ साप्ताहिकात ‘माझी दिवाळी’ नावाची पहिली कथा प्रकाशित
- ३२.१९४९ : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पहिली भेट
- ३३. ‘खुळवाडी’ हा पहिला कथासंग्रह प्रकाशित, १९५७
- ३४. २ मार्च १९५८ : महाराष्ट्र दलित साहित्य संघाच्या पहिल्या दलित साहित्य संमेलनाचे उद्घाटक अध्यक्ष बी.सी. कांबळे
- ३५.१९५९ ‘फकिरा’ कादंबरी प्रकाशित
- ३६. १९६१ फकिराला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
- ३७. १९६१ : ‘माझा रशियाचा प्रवास’
- ३८. वैजयंता या चित्रपटाला ‘सर्टिफिकेट ऑफ मेरिट’ हे उत्कृष्ट मराठी चित्रपटाचे पारितोषिक
- ३९. १९६२ : साताऱ्याच्या शिवाजी महाविद्यालयात व्याख्यान
- ४०.१९६७ च्या सुमारास शासनाने गोरेगावच्या सिद्धार्थनगरात क्रमांक २ च्या गृहनिर्माण वसाहतीत तीन खोल्यांचे घर दिले. चिरागनगरातून ते मग इथे राहायला आले.
- ४१.१९६८ मध्येच शासनाने कलावंत मानधन म्हणून महिन्याला तीनशे रुपये दिले
- ४२. ‘मृत्यूकडून जीवनाकडे’ या नावाची जीवनी लिहिण्याचा संकल्प. पण ही जीवनी लिहून झाली नाही.
- ४३.१८ जुलै १९६९ रोजी दुपारी गोरेगावमधील राहत्या घरी निधन